Shreya Maskar
आसनगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वसलेले एक विकसनशील शहर आणि रेल्वे स्थानक आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य वाढते.
ठाणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहुली किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे. येथे दाट हिरवळ, खडकाळ शिखरे आणि हंगामी ओढे पाहायला मिळतात.
वाडा-शहापूर मार्गावर तानसा वन्यजीव अभयारण्याजवळ तानसा तलाव वसलेले आहे. हे ठिकाण शांतता आणि हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. पावसाळ्यात आणि पहाटेच्या वेळी हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आणि शांत असते.
आसनगाव जवळ स्थित असलेला भातसा नदीचा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात, वाहत्या स्वच्छ पाण्याचा आणि निसर्गरम्य ओढ्यांचा आनंद घेण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.
माळशेज घाट हा आसनगावपासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर असलेला एक निसर्गरम्य घाटमार्ग आहे. तो धुक्याने वेढलेले रस्ते, खोल दऱ्या आणि अनेक हंगामी धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.
अजोबा पर्वत हे सह्याद्री पर्वतरांगेतील ४,५११ फूट उंचीचे शिखर आहे, जे आसनगावपासून साधारण ४० किमी अंतरावर असलेल्या 'देहेणे' गावाजवळ स्थित आहे.
भांडारगड हा एक ऐतिहासिक डोंगरावरील किल्ला आहे. तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आसनगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आणि प्रसिद्ध माहुली किल्ल्यालगत स्थित आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.