Dhanshri Shintre
मुंबई ते घृष्णेश्वर मंदिराचे एकूण अंतर सुमारे ३३० ते ३५० किलोमीटर आहे. प्रवास साधारणतः ७ ते ८ तासांचा असतो, मार्ग आणि वाहनावर अवलंबून आहे.
मुंबईहून औरंगाबादपर्यंत थेट अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. मुख्य रेल्वे स्थानक औरंगाबाद स्टेशन आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस मुंबईहून औरंगाबादपर्यंत नियमित धावतात.
खाजगी कारने प्रवास करणे सोयीस्कर आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे मुंबई -ठाणे -कसारा घाट- इगतपुरी - नाशिक - वैजापूर - एलोरा - घृष्णेश्वर मंदिर हा आहे.
NH 160 आणि नंतर NH 52 मार्गे प्रवास केल्यास रस्ता सुस्थितीत आणि निसर्गरम्य आहे. रस्त्यात नाशिक, सिन्नर, वैजापूर या ठिकाणी थांबता येते.
घृष्णेश्वर मंदिर दररोज सकाळी ५:३० ते रात्री ९:३० पर्यंत खुले असते. सोमवार आणि श्रावण महिन्यात भाविकांची विशेष गर्दी असते.
घृष्णेश्वर मंदिराजवळ प्रसिद्ध एलोरा लेणी, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे आहेत. एका दिवसाच्या प्रवासात सर्व ठिकाणे पाहता येतात.