Sakshi Sunil Jadhav
सध्या उन्हाळा सुरु झालाय आणि मुलांच्या शाळांना लवकर सुट्टी पडेल. यादिवसांमध्ये नेहमीच मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही आरामासाठी सुंदर अन् शांत ठिकाणी फिरायला आवडतं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मार्च ते एप्रिल महिन्यात मुलांसोबत पिकनिकसाठी तुम्ही पुढील प्रसिद्ध बीचवर जाऊन थमाल करु शकता. स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं.
मुंबईपासून जवळपास 95 किमी अंतरावर असलेला हा बीच कुटुंबासोबत पिकनिकसाठी फेमस आहे. फोटोसाठी सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ उत्तम मानली जाते. जवळच स्थानिक सीफूड रेस्टॉरंट्स आणि कोकणी पदार्थ मिळतात.
मोत्यासारखं चमकणारं पाणी आणि सोनेरी वाळूमुळे हा बीच कोकणातला सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. मार्च-एप्रिलमध्ये ईथे हवामानही उत्तम असतं. जवळच होमस्टे, रिसॉर्ट्स आणि बीचसाइड कॅफे उपलब्ध आहेत.
शांत वातावरण आणि स्वच्छ किनाऱ्यामुळे हा बीच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. जवळच प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे धार्मिक पर्यटनही करता येते. राहण्यासाठी रिसॉर्ट्स आणि लॉज उपलब्ध आहेत.
मुंबईहून या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत कार, एसटी बस किंवा फेरी बोटीद्वारे सहज पोहोचता येते. Gateway of India येथून फेरीने अलिबागला जाण्याचा अनुभवही पर्यटकांसाठी खास असतो.
अलिबाग, काशिद आणि हरिहरेश्वर येथे बजेट होमस्टेपासून ते लक्झरी रिसॉर्ट्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुटुंबासोबत जाणाऱ्यांसाठी समुद्रकिनाऱ्याजवळील होमस्टे सुरक्षित पर्याय ठरतात.
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यांवर अप्रतिम दृश्य दिसते. निळाशार समुद्र, सोनेरी वाळू आणि नारळाची झाडे फोटोसाठी उत्तम पार्श्वभूमी देतात. कुटुंबासोबत आठवणी जपण्यासाठी बीचवरील वॉक आणि शेल्ससह फोटो काढणं हा खास अनुभव ठरु शकतो.
कोकणात ताजे सीफूड, सोलकढी, कोकणी थाळी आणि नारळावर आधारित पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. स्थानिक ढाबे आणि बीचसाइड रेस्टॉरंट्समध्ये प्रॉन्स, फिश फ्राय आणि कोकम सरबत नक्की ट्राय करा