Bharat Jadhav
मयत व्यक्तीच्या नावे जमीन असल्याने अनेकदा जमिनीच्या व्यवहारात कायदेशीर अडचणी येतात.
राज्य सरकारने राज्यात 'जिवंत सातबारा मोहिम' राबवण्याचा निर्णय घेतलाय.
मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी-विक्री आणि कर्ज प्रक्रियांमध्ये अनेक अडचणी येत असतात.
सरकारने सुरू केलेल्या मोहिमेत गावांमधील मृत खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाते.
वारसांचे नाव सातबाऱ्यावर नोंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील.
सातबाऱ्यावरील सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या नियमानुसार मंडळाधिकारी सुधारित सातबारा तयार करणार आहेत. त्यामुळे वारसांना त्यांचा हक्क मिळेल .