Manasvi Choudhary
मुख्यमंत्र्याचा बंगला वर्षा हा कायमच चर्चेत असतो.
मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाला वर्षा हे नाव का ठेवलं आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संबंध वर्षा बंगल्याशी आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली तेव्हा त्यांनी वर्षा हे नाव ठेवलं.
पावसाळा वसंतरावाचा आवडता ऋतू होता यामुळेच त्यांनी पहिल्याच दिवशी या बंगल्याचं नामकरण केलं.
वसंतरावांनी ५ डिसेंबर १९६३ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पहिली बैठक संपवून वर्षावर राहायला गेले.
यामुळेच नंतर वर्षा या बंगल्याला मुख्यमंत्र्याच्या बंगला हे लौकिक मिळालं.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वर्षावरून त्याचं वास्तव्य हलवलं.
परंतु त्यांच्या मनात वर्षा ऋतू कायमच आठवणीत राहिला.
यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची वर्षा ही ओळख आजही कायम आहे.