ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकरणात आज, २ जुलै रोजी मोठा भूकंप झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ३० ते ४० आमदारांसह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवारांनी हे बंड (?) का केले यामागची काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊयात.
मागील महिन्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष संघटनेत बदल केले.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच इतर नेत्यांवर पक्षातील प्रमुख जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
यामुळेच मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
अखेर अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली. ३० ते ४० आमदारांसह त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर, अन्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.