Sakshi Sunil Jadhav
किडनी शरीरात खूप महत्त्वाचा अवयव म्हणून काम करत असते. ती शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करते. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीशी संबंधित आजार वाढताना दिसत आहेत, असं तज्ज्ञ म्हणतात.
इंटरनेटवर आरोग्यविषयक अनेक माहिती उपलब्ध असते, पण ती नेहमी अचूक असेलच असं नाही. किडनीसंबंधी समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
भारतामध्ये किडनी फेल होण्याची प्रमुख कारणं म्हणजे डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर. या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी वर्षातून किमान एकदा किडनीची तपासणी करावी.
CKD म्हणजे किडनी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ सामान्यपेक्षा कमी कार्य करत आहे. वेळेवर उपचार आणि योग्य प्रकारे काळजी घेतल्यावर हा आजार नियंत्रित ठेवता येतो.
आज अनेक तपासण्या उपलब्ध असल्याने लोक रिपोर्ट्स पाहून घाबरतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतल्यास परिस्थिती नियंत्रित ठेवता येते.
काही लोक लवकर बरे होण्याच्या अपेक्षेने वारंवार डॉक्टर बदलतात. पण किडनीचे आजार दीर्घकाळ व्यवस्थापनाची गरज असते, त्यामुळे एका तज्ज्ञावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे.
ब्लड शुगर आणि बीपी नियंत्रणात ठेवणे किडनीसाठी अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी किडनीचे आरोग्य सुधारते.
किडनीच्या आजारात रुग्णाची जीवनाची गुणवत्ता चांगली ठेवणे महत्त्वाचे असते. गंभीर स्थितीत डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटसारखे उपचार आवश्यक ठरू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि निरोगी जीवनशैली यामुळे किडनीचे आजार मोठ्या प्रमाणात टाळता येतात.