ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्योतिषशास्त्रात तांब्याला महत्त्वाचा धातू मानला आहे. तांब्याच्या वस्तू घरात ठेवल्याने ग्रह दोष दूर होतात.
अनेक लोक धातूपासून बनवलेली कोणतीही वस्तू कोणत्याही दिशेला ठेवतात. त्यामुळे त्यांना अशुभ परिणाम पहायला मिळतात.
वास्तुशास्त्रानुसार, तांब्याला शुभ धातू मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते.
घराच्या पूर्व दिशेला तांब्याची कोणतीही वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. ही दिशा सूर्य देवाची दिशा मानली जाते.
तांब्याच्या वस्तू घराच्या ईशान्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
पश्चिम दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. या दिशेला तांब्याचा कलश, देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा तांब्याचा दिवा ठेवल्यामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होते.
आग्नेय दिशा ही अग्निदेवाची दिशा मानली जाते. या दिशेला तांब्याचा दिवा, कलश किंवा तांब्याचे वाद्य ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.