Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे विकसित झाले होते. त्या काळात स्वराज्य केवळ युद्धातच नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही मजबूत होतं
शिवाजी महाराजांनी किनाऱ्यांवर मजबूत नौदल उभारलं आणि त्यासाठी जहाजबांधणी हा मोठा उद्योग बनला. राजापूर, विजयदुर्ग, आणि मालवण येथे जहाजं तयार केली जात.
महाराष्ट्रातील पैठणी, सोलापुरी चादरी आणि कोल्हापुरी कापडं प्रसिद्ध होती. विणकर समाज हा त्या काळात अत्यंत कार्यशील होता. स्थानिक बाजारात आणि परदेशातही या वस्त्रांची मोठी मागणी होती.
शिवाजी महाराजांच्या सैन्यासाठी तलवारी, भाले, तोफा आणि तोफगोळे तयार करणारे कारागीर होते. जावळी, पुणे आणि रायगड परिसरात लोहारकामाला मोठी गती मिळाली होती.
धान्य, गूळ, तेल आणि मसाले यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होतं. शेतीसोबतच गुळाचे कारखाने आणि तेलघाणी चालवल्या जात. या उद्योगांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण बनली होती.
सोनार हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात फुलले होते. सोन्याचे दागिने, पितळी वस्तू आणि चांदीची भांडी तयार करून राजघराण्यात व श्रीमंत घरांमध्ये वापरली जात.
किल्ले, मंदिरे, दरवाजे आणि दरबारवाडे बांधण्याचे काम त्या काळात जोरात चालू होते. कुशल शिल्पकार आणि मिस्त्री यांचा या कामात मोठा सहभाग होता. रायगड, तोरणा, प्रतापगड हे किल्ले त्याकाळच्या बांधकाम कौशल्याचे उदाहरण आहेत.