Longest Train Journey: भारताचा सर्वात लांब रेल्वे प्रवास! प्रवासाला लागतो ३ दिवसांपेक्षा अधिक काळ, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विवेक एक्सप्रेस

ही एक्सप्रेस ट्रेन ४ वेगवेगळ्या मार्गांवर धावते. यातील सर्वात लांब रूट दिब्रुगड ते कन्याकुमारीचा असून ४२७३ किमीचा प्रवास करते.

किती थांबे घेते?

विवेक एक्सप्रेस प्रवास ८० तास १५ मिनिटांत पूर्ण करते, ९ राज्यांतून जात असून जवळपास ५५ थांबे घेत असते.

सिलचर एक्सप्रेस

सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन तिरुवनंतपुरम सेंट्रल ते गुवाहाटी धावते, २१ नोव्हेंबर २०१७ रोजी ती सिलचरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हिमसागर एक्सप्रेस

ही ट्रेन कन्याकुमारी ते कटरा दरम्यान धावते, १२ राज्यांमधून प्रवास करताना ७३ थांबे घेत असते.

टेन जम्मू एक्सप्रेस

तिरुनेलवेलीपासून जम्मू काश्मीरमधील कटरा पर्यंत ही ट्रेन सुमारे ३,६३१ किलोमीटर प्रवास करून पोहोचते.

किती स्थानकांवर थांबते?

टेन जम्मू एक्सप्रेस मार्गावरील ५२३ स्थानकांपैकी फक्त ६२ ठिकाणी थांबते आणि हा प्रवास ७१ तास २० मिनिटांत पूर्ण करते.

नवयुग एक्सप्रेस

ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन जम्मू तवीपासून मंगलोर सेंट्रलकडे धावते आणि दर आठवड्याला एकदा सेवा देते.

किती स्थानकांवर थांबते?

नवयुग एक्सप्रेस ३६०७ किमी प्रवास करते, ६१ ठिकाणी थांबते आणि संपूर्ण प्रवास पूर्ण होण्यासाठी ६८ तास लागतात.

NEXT:  'ही' आहे भारतातील सर्वात लांब ट्रेन, डब्बे मोजता मोजता फुटेल घाम

येथे क्लिक करा