ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या महाराष्ट्राभर पावसाचे आगमन झालेले आहे.
पावसाळा सुरु होताच अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
यात प्रामु्ख्याने जाणवणारी समस्या अर्थात पाऊस सुरु होताच घरात माश्या आणि अनेक किडे येतात.
यापासून सुटका मिळवण्यासाठी फरशी पुसताना पाण्यात खाली सांगत असलेल्या गोष्टी मिसळा.
घरातील फरशी पुसताना त्या पाण्यात काही प्रमाणात व्हिनेगर मिसळा.याने दिवसभर किडे किंवा माश्या घरात येणार नाही.
फरशी स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक प्रकराचे फिनाइल मिळतात. फिनाइलचे काही थेंब पाण्यात मिसळा. याच्या साहाय्यानेही माश्या घरात राहत नाही.
फरशी पुसताना त्यात काहीसे मीठ मिसळल्याने पावसाळ्यात घरात माश्या किंवा किडे येत नाहीत.
बेंकिग सोड्याच्या वापरानेही पावसाळ्यात घरात येणाऱ्या माश्या तुम्ही पळवून लावू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.