ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय हवामान खात्याने राज्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकणात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होत आहे.
काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उन्हाच्या झळा जाणवत आहे.
हवामान खात्यानुसार, येत्या २८ आणि २९ एप्रिलला पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, कोकणासह राज्यात अनेक भागात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड देशात उष्णतेच्या झळा जाणवतील.
राज्यात महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.