ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचदा शिल्लक उरलेले अन्न आपण गरम करून खातो.
मात्र, काही पदार्थ असे आहेत जे गरम करून खाल्ल्यास आरोग्यास हानी पोहचवू शकतात.
बटाट्याची भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये.
चिकन पुन्हा पुन्हा गरम करून खाल्याने त्यातील प्रोटीन कम्पोजिशन बदलते पचनास देखील अडथळा येतो.
अंड्याची भाजी गरम केल्यामुळे देखील बरेच नुकसान होते. त्यात प्रोटीन असतात जे गरम केल्याने नष्ट होतात.
स्वयंपाक केल्यानंतर शक्य तितक्या लवकर अंडी खावीत. अंड्यातील प्रथिनांसह त्यात असलेले नायट्रोजन गरम केल्याने कर्करोग (कॅन्सर) होऊ शकतो.
मशरूम शिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाणे फायदेशीर नसते. त्यात असे अनेक घटक आहेत, जे नंतर आपल्या पाचन तंत्रासाठी हानिकारक असतात. जर मशरूम शिल्लक राहिले असतील तर ते थंड खा, पुन्हा गरम करू नका.