ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाळी येणं ही नैसर्गि प्रक्रिया आहे, मात्र ती वेळेत येणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
धावपळीच्या या जीवनात महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो आहे.
आजकाल महिला, मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.
अनियमित मासिक पाळी होण्याची काय कारणे आहेत हे माहित करून घ्या
उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. मासिक पाळी वेळेवर येणेही थांबू शकते.
नियमित व्यायाम केल्याने हार्मोन्सला नियंत्रीत करण्यास आणि आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे रोज किमान ३० मिनीटं व्यायाम नक्की करायला हवा.
वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते.
शरीरातील हिमोग्लोबीन कमी असल्याने मासिक पाळी अनियमित होते.