ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यातील वातावरण अल्हादायक वाटते. परंतु, यासह आपण अनेक आजारांना देखील बळी पडतो.
अशावेळी, पावसाळ्यात काही फळे खाल्ल्यास आजाराला निमंत्रण दिले जाऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्यात कोणती फळे खाऊ नये.
पावसाळ्यात द्राक्षांना फंगल इन्फेक्शन होतो, जर तुम्ही ती न धुता खाल्ली तर अतिसार आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळ्यात लिची ओलसर होते, ज्यामुळे ती खराब होऊ शकते.
पावसात कलिंगड खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
पावसाळ्यात बेरीजवर बॅक्टेरिया चिकटतात यामुळे बेरीज खाणं टाळा.