Manasvi Choudhary
आजकाल डोकेदुखीची समस्या कॉमन झाली आहे. या पदार्थांचे सेवन केल्यास वाढती डोकेदुखी कमी होईल आणि शरीराला लवकर आराम मिळेल.
आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. याचा चहा प्यायल्यामुळे डोकेदुखी पळून जाते.
नारळपाणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, तसेच यात अनेक पोषक तत्व आढळतात. त्यामुळे डोके दुखत असेल तर नारळपाणी प्यावे.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई असते. हे दोन्ही पोषक घटक डोकेदुखीवर रामबाण उपाय आहे.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम हे पोषक घटक असतात. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होत असल्यास केळ खावे.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी दही खाल्ल्यास शरीराला आराम मिळतो.
ज्या लोकांना वारंवार डोके दुखीचा त्रास होत असेल त्यांनी नियमित आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
डार्क चॉकलेट खाल्ल्यास त्वरित डोकेदुखी थांबते. तुळस तुळस आणि आल्याचा रस प्यायल्यामुळे डोकेदुखी लगेच थांबते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या