Sakshi Sunil Jadhav
शरीरातलं रक्त कमी झालं की शरीर तुम्हाला कोणतंही काम करताना साथ देत नाही. तसेच तुम्हाला दिवसभर अशक्तपणा जाणवतो.
शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी झालं तर, अशक्तपणा, चक्कर येणं, सतत थकवा जाणवणं आणि त्वचा निस्तेज दिसणं यांसारख्या समस्या उद्भवतात.
तुम्ही यासाठी आहारात बीटरूटचा समावेश करू शकता. त्यामध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
डाळिंब हे लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबरचा उत्तम स्रोत मानलं जातं. तुम्ही रोज डाळिंब खाल्लत तर शरीरातले हिमोग्लोबीन वाढू शकतं.
पालकमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुम्ही उकडलेले मूग खाऊ शकता. त्याने हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा जाणवत नाही.
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर्स, व्हिटॅमीन-बी योग्य प्रमाणात असतं.
काळे किंवा पांढरे तीळ हे लोह मिळवण्यासाठी बेस्ट आहेत.आहारात तिळाचा समावेश केल्याने शरीरातली रक्ताची पातळी सुधारते.
वरील माहिती सामान्य माहितीसाठी आहे. रक्ताची कमतरता किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.