Dhanshri Shintre
पावसाळ्यात सकाळी उठल्यावर, आपल्या शरीराला आणि मनाला आराम देणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत.
यामध्ये कोमट पाणी पिणे, हल्का नाश्ता करणे, आणि थोडा वेळ योगा किंवा ध्यान करणे समाविष्ट आहे.
पावसाळ्यात आळस वाढतो, पण नियमित वेळेला उठल्याने शरीर सशक्त राहते.
यामुळे ताजेतवाने वाटते आणि संसर्ग टाळता येतो.
कोमट पाण्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
दमट हवेमुळे मानसिक तणाव वाढतो, ध्यान-प्राणायाम शांती देतो.
घरातच हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करून शरीर सक्रिय ठेवा.
हर्बल टी किंवा आले आणि हळदीचे गरम दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
दमट हवेमुळे त्वचा रोग टाळण्यासाठी कोरडे कपडे आवश्यक आहेत.
पावसाळ्यात पचन क्रिया हळू होते, त्यामुळे जड पदार्थ टाळावे. फळे, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ खावे.