Surabhi Jayashree Jagdish
भारतात आणि जगभरात विमान प्रवास हा वाहतुकीचा सर्वात जलद आणि सोयीस्कर मार्ग मानला जातो.
विमानतळ आणि विमानांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अनेक कठोर नियम बनवले आहेत.
जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं किंवा तुरुंगातही जावं लागू शकतं.
विमानात किंवा विमानतळावर बोलण्यास काही शब्द सक्त मनाई आहे.
बॉम्ब, बंदूक, चाकू, शूटर, दहशतवादी, हायजॅक, स्फोटक, अपघात असे शब्द विमानतळावर किंवा विमानात बोलू नयेत.
विमानतळावर किंवा विमानात जैविक शस्त्रं, तस्करी किंवा ड्रग्जसारखे शब्द वापरू नयेत.
असे शब्द ऐकताच सुरक्षा कर्मचारी लगेच सतर्क होतात आणि कारवाई करण्यास सुरुवात करतात आणि प्रवासातही विलंब होतो.