Bharat Jadhav
गरम पाण्याने आंघोळ केल्यानं हाडे कमकुवत होतात, असे काहीजण म्हणतात. गरम पाण्यामुळे हाडांमधील कॅल्शियम वितळते, ज्यामुळे ते कमकुवत होत असतात असं म्हटलं जातं.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पुलक वात्स्य म्हणतात करतात की गरम पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमधील कॅल्शियम वितळते आणि ते कमकुवत होतात या दाव्यात काहीही तथ्य नाही.
तुमच्या हाडांची ताकद तुमच्या व्हिटॅमिन डीच्या पातळी, कॅल्शियम, प्रथिनांचे सेवन आणि क्रियाकलाप पातळीवर अवलंबून असते. तुम्ही थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ केली तरी त्याचा काही फरक पडत नाही.
डॉ. पुलक म्हणतात की हिवाळा असला तरी, दररोज आंघोळ करणे ही एक चांगली सवय आहे जी तुमची स्वच्छता राखण्यास मदत करते.
फक्त थंडीमुळे दररोज आंघोळ न करण्यामागे कोणतेही वैज्ञानिक तर्क नाही.