Sakshi Sunil Jadhav
बर्याच वेळा आपण सकाळी गरमागरम चपात्या बनवून डब्यात ठेवतो, पण दुपारी जेवायला बसल्यावर त्या चपात्या ओल्या, चिकट आणि पाणी सुटलेल्या अवस्थेत मिळतात.
पुढे चपातीची चव आणि आकार दोन्ही खराब होतो. पण काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येवर सहज मात करू शकता. चला जाणून घेऊया सोप्या टिप्स.
चपात्या तयार झाल्यानंतर लगेच झाकल्याने वाफ आत साठते आणि पाणी सुटतं. त्या थोड्या गार झाल्यावरच डब्यात ठेवा.
डब्याच्या तळाशी किंवा चपात्यांच्या मध्ये एक कोरडा टिश्यू पेपर ठेवल्याने जास्त ओलावा शोषला जातो. त्यामुळे चपात्या कोरड्या राहतात.
गरम चपातीवर हलकं तूप किंवा तेल लावल्याने ती मऊ राहते आणि ओलावा साठत नाही.
इन्सुलेटेड (hot case) डबा वाफ आत अडकवतो नाही. त्यामुळे चपात्या दीर्घकाळ ताज्या राहतात.
अर्धवट गरम असताना डब्यात ठेवल्यास वाफ तयार होते आणि पाणी सुटतं. त्यामुळे चपात्या खोलीच्या तपमानावर आल्यावरच पॅक करा.
जास्त पातळ चपाती पटकन ओली होते, तर जास्त घट्ट चपाती कडक होते. योग्य जाडी ठेवा म्हणजे चव टिकते.