Manasvi Choudhary
यावर्षी २० सप्टेंबर २०२५ रोजी नरकचतुर्दशी आहे. या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यांनतर तेलाने स्नान करून विजयाचा जल्लोष साजरा केला .
याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. दिवाळी पहाटच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान केले जाते.
दिवाळीला अभ्यंगस्नानच्या दिवशी सुंगधी उटणे आणि तेल लावून खास अंघोळ केली जाते.
नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याचा शुभ मुहूर्त १ तास १२ मिनिटांचा आहे.
या दिवशी चंद्रोदय सकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी होणार आहे. म्हणजेच ५ वाजून १३ मिनिटांसह सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत अभ्यंगस्नान करू शकता.