Shreya Maskar
दह्यामध्ये मीठ घालून खाल्ल्याने वजन नियंत्रण, कॅलरीजवर नियंत्रण करायला मदत होते. चिमूटभर मीठ दह्याचा आंबटपणा संतुलित करते आणि शरीरातील कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स भरून काढण्यास मदत करते.
मिठातील सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मिठाचे सेवन मर्यादित ठेवावे.
त्वरित ऊर्जेचेसाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी साखर खा. आंबवलेल्या दुग्धजन्य पदार्थाचा तीव्र आंबटपणा कमी होतो.
प्रक्रिया केलेली साखर अतिरिक्त कॅलरीज वाढवते, रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवते आणि मधुमेहींसाठी असुरक्षित असते.
साध्या दह्यामध्ये मीठ घालून खाणे अधिक चांगले आणि आरोग्यास फायदेशीर ठरते. कारण त्यात अतिरिक्त कॅलरीज नसतात आणि रक्तातील साखरेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
याउलट, साखर घातल्याने शरीराला केवळ 'रिकाम्या' कॅलरीज आणि कर्बोदके मिळतात. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
साखर आणि मीठ यांचे दोघांचेही फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी करावे आणि आहारात घ्यावे. कोणत्याही पदार्थाचा अतिरेक आरोग्यास घातक ठरतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.