Priya More
जास्त गोड खाल्ल्यामुळे फक्त रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही तर आपले आरोग्य देखील खराब होते.
मिठाई आणि गोड पदार्थ खाण्याची सतत इच्छा होणे ही साधी गोष्ट नाही तर यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
गोड खाल्ल्यामुळे शरिराला लवकर एनर्जी मिळते. कारण साखर थेट रक्तात मिसळते.
जर तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही ब्लड लेव्हलची तपासणी करून घ्या.
रक्तातील साखरेच्या पातळीत असंतुलन असेल तर गोड खाण्याची इच्छा होते.
मानसिक दबाव किंवा ताणतणावाच्या वेळी शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे गोड खाण्याची इच्छा होते.
गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिनसारख्या आनंदी संप्रेरकांची पातळी वाढते.
तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचे शरीर ऊर्जेसाठी गोड पदार्थाकडे आकर्षित होते.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात लेप्टिन आणि घरेलिन यांचे असंतुलन होते. यामुळे जास्त गोड खाण्याची इच्छा होते.
शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता कमी असल्यास गोड खाण्याची इच्छा वाढते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीराला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा राखण्यास मदत होते.