ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळी हे फळ आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
मात्र अनेकांना केळी खाण्याची योग्य वेळ माहित नाही.
पूर्वीपासून केळी आणि दूध असं नाश्ता म्हणून खाल्ले जाते.
यामुळे सकाळच्या वेळी केळी खाणे उत्तम मानले जाते.
मात्र हृदयाच्या आरोग्यासाठी अनोशापोटी केळी खाणं योग्य मानलं जात नाही.
अनेकजण केळी रात्री खातात. रात्री केळी खाल्याने सर्दी होते.
आर्युवेदानुसार, केळी ही सकाळी नाश्ता झाल्यानंतर खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते आहे.