Surabhi Jayashree Jagdish
भारतीय जेवणामध्ये हळदीचा वापर हा केला जातोच.
हळदीचा वापर हा आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो.
मात्र काही भाज्या आहेत ज्यामध्ये हळदीचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो
मेथी, पालक, शेपू, या पालेभाज्यांमध्ये हळद घातल्यास त्यांचा नैसर्गिक, हिरवागार रंग फिकट पिवळा किंवा राखाडी-हिरवा होऊ शकतो.
ज्या भाज्यांचा रंग पांढरा असतो त्यांच्यात हळदीचा वापर करू नये. पांढरी भाजी बनवताना हळद घातल्यास रंग पिवळा दिसू शकतो.
वांग्याच्या भाजीत हळद घातल्यास चव थोडी कडवट लागण्याची शक्यता असते.
मशरूमची स्वतःची एक वेगळी चव असल्याने हळदीच्या तीव्र चवीमुळे त्याची मूळ चव बदलू शकते.