Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे. वास्तुशास्त्रानुसार आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दिवा खूप महत्त्वाचा आहे.
तुम्ही घरात दिवा लावताना खाली दिलेल्या गोष्टी त्यात टाकल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि घरामध्ये सुखशांती लाभेल.
संध्याकाळी दिवा लावल्यास त्यामध्ये २ लवंग घालाव्यात. त्यामुळे तुम्हाला शुभलाभ होतील.
लवंगचा उपाय केल्यास घरामध्ये सुखशांती राहते आणि पैशांची कमतरता भासत नाही.
तूपाच्या दिव्यामध्ये काळी मिरी टाकून दिवा देवघरात ठेवा. यामुळे जीवनात सकारात्मकता येईल.
खूप वेळेपासून तुमचे एखादे काम रखडले असल्यास काळी मिरी टाकून दिवा लावावा. यामुळे तुमचे थांबलेले काम पूर्ण होईल.
संध्याकाळी दिवा लावताना त्यामध्ये १ रुपयाचे नाणे ठेवावे. त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि नकारात्मकता दूर राहते.
१ रुपयाच्या उपायामुळे तुमच्यावरील कर्ज लवकर दूर होईल आणि तुमची धनसंपत्ती वाढेल.