Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ होते. त्यांनी यशस्वी होण्यासाठी दिलेले मार्गदर्शन आजही लोक फॉलो करतात.
चाणक्यांनी पुढे यशस्वी महिलांमध्ये असलेलं गुपित सांगितलं आहे. याचा वापर करून प्रत्येक महिला आत्मनिर्भर बनू शकतात.
हुशार महिला स्वतःचा विचार स्वतः करतात. इतरांचे मत ऐकून घेतात, पण शेवटी निर्णय स्वतःच्या ईच्छेने घेते.
प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखी विचार करेलच असे नाही, हे महिला ओळखतात. त्यामुळे अपेक्षा कमी ठेवून मानसिक स्ट्रेस घेणं टाळते.
सर्व जबाबदाऱ्या एकटीने उचलण्याऐवजी महिला कामांचे योग्य नियोजन करतात. इतकेच नाही तर 'नाही' म्हणण्याची ताकद त्यांच्यात असते.
भूतकाळातल्या अनुभवांमधून शिकणे महत्वाचे आहे, पण त्याच विचारांमध्ये भविष्य खराब करणे योग्य नाही, हे महिलांना माहीत असतं.
महिला भावना दडपून टाकत नाही, पण भावनेच्या भरात चुकीचे निर्णयही सुद्धा घेत नाहीत. हा त्यांच्यातील सगळ्यात चांगला गुण आहे.
महिला त्यांचा आत्मसन्मान इतरांच्या कौतुकावर किंवा टीकेवर अवलंबून ठेवत नाहीत. स्वतःच्या गुणांवर त्यांचा ठाम विश्वास असतो.
महिला नात्यांमध्ये फक्त भावना नाही तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि संगत यांना महत्त्व देतात.
गरज नसताना वाद, गॉसिप किंवा अर्थ नसलेल्या चर्चेत वेळ न घालवता महिला स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात.