Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचे मार्ग दाखवणारे उत्तम गुरु मानले जातात. बरीच श्रीमंत आणि हुशार मंडळी यांचे विचार फॉलो करतात.
चाणक्यांनी आयुष्यातले आणि व्यावहारिक जीवनातले काही नियम स्पष्टपणे आणि कठोर शब्दात सांगितले आहेत.
काही लोकांचा स्वभाव हा तुमच्या आयुष्यासाठी अडथळे निर्माण करणारा किंवा घातक ठरु शकतो. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
तुमच्या आयुष्यात जर काही लोक तुमच्याशी लहान गोष्टींवरुन वाद घालत असतील तर ते तुमच्यासाठी घातक ठरु शकतात.
बऱ्याचदा जे लोक स्वभावाने हिंसक असतात ते तुमच्या महत्वाच्या वेळेस विश्वासघात करु शकतात. त्यामुळे तुम्ही सावध असणे गरजेचे आहे.
आत्ताच्या काळात लोक ताकद, धमक्या आणि शक्तीवर अवलंबून असतात. त्यांच्यापासून व्यावहारिक अंतर ठेवा आणि गरजेनुसार मर्यादित संबंध ठेवा.
राजघराण्यातील किंवा उच्च पदावरील व्यक्ती त्यांच्या स्वार्थी कारणांसाठी कोणालाही फसवू शकतात.
विश्वास हळूहळू आणि वर्तनाचे निरीक्षण करून निर्माण केला पाहिजे. असे चाणक्यांचे म्हणणे आहे. चाणक्याचा उद्देश आपल्याला सावध आणि शहाणे बनवणे होता, शत्रुत्व वाढवणे नाही.