Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या जगात मैत्री, ऑफिस, नातेसंबंध यामध्ये अनेकदा टॉक्सिक लोक भेटतात. पण ते मागे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बोलतात. याने तुमचा स्वत: वरचा विश्वास उडू शकतो.
चाणक्य सांगतात, प्रत्येक हसरा चेहरा आपला नसतो. टॉक्सिक लोक गोड बोलून विश्वास मिळवतात, पण मागून नुकसान करतात.
नेहमी तक्रार, टीका आणि नकारात्मक चर्चा करणारे लोकांमध्ये राहिल्याने तुमच्या विचारात बदल होईल. अशा लोकांपासून दूर राहणंच शहाणपणाचं आहे.
जे लोक तुमच्या मर्यादांचा आदर करत नाहीत, ते तुमचाही आदर करत नाहीत. चाणक्य नितीनुसार सीमा आखणं हा उद्धटपणा नसून गरज आहे.
प्रत्येक टोमण्याला उत्तर देणं गरजेचं नसतं. अनेकदा शांत राहिल्यानेही टॉक्सिक लोक स्वतःच माघार घेतात.
स्वतःची मानसिक शांती जपणं हा स्वार्थ नाही, तर गरज आहे. चाणक्य म्हणतात, आत्मसंरक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
टॉक्सिक लोक अपराधीपणाची भावना निर्माण करून आपल्याला नियंत्रित करतात. अशा भावनिक खेळी वेळेत ओळखणं महत्त्वाचं आहे.
जे लोक सतत तुम्हाला कमी लेखतात, ते तुमच्या प्रगतीचे शत्रू असतात. चाणक्य नितीनुसार आत्मसन्मान सर्वात मोठी संपत्ती आहे.