साम टिव्ही ब्युरो
भारतात प्रत्येक चार मिनिटाला रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होतो ही बाब चिंताजनक आहे.
झोपेमुळे पहाटे 2 ते 5 आणि दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान अपघातांचं प्रमाण जास्त आहे.
गाडी चालवताना काही नियम पाळले तर अपघात होणारच नाही.
वाहन चालवताना मद्यपान करु नये. तसेच मोबाईलवर बोलू नये.
रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवू नये.
विनाहेल्मेट दुचाकी अन् सीटबेल्टविना चारचाकी चालवू नका.
वाहनांचा वेग मर्यादित ठेवा, सलग सहा-सात तास ड्रायव्हिंग नका करू.
रस्त्याने वाहन चालवताना लेनकटिंग करु नये.
गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शहरात वेगाने गाडी चालवू नका.
सार्वजनिक रस्त्यावर दुसऱ्या कारशी शर्यत लावू नका.