ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी जेव्हा आपले पोट रिकामे असते तेव्हा शरीराची पीएच पातळी असंतुलित असते आणि पोटामध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते. अशावेळी, काही गोष्टी खाल्ल्याने गॅस, छातीत जळजळ, उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात
लिंबू, गोड लिंबू आणि संत्री यांसारख्या फळांमध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने अॅसिडिटी वाढवू शकते. यामुळे छातीत जळजळ, पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.
दही आरोग्यदायी असले तरी, ते रिकाम्या पोटी खाणे हानिकारक ठरु शकते. यात लॅक्टिक अॅसिड असते, जे रिकाम्या पोटी गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये मिसळल्यास पोट खराब होऊ शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने आतड्यांमध्ये जळजळ आणि गॅस होऊ शकतो. यामुळे उलट्या देखील होऊ शकतात.
बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पितात, परंतु ही सवय हानिकारक ठरु शकते. त्यामध्ये असलेले कॅफिन पोटातील अॅसिडिटीचे प्रमाण वाढवते.
रिकाम्या पोटी तुम्ही भिजवलेले बदाम, कोमट पाणी, ओट्स, दलिया, काजू, पपई आणि सफरचंद खाऊ शकता.