Sakshi Sunil Jadhav
मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेली ही चार ठिकाणं निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकता.
मान्सून सुरू होताच मुंबईकरांची पावलं हिल स्टेशनकडे वळतात. शहराच्या गोंगाटापासून लांब जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हा चांगला ऋतू मानला जातो.
मुंबईपासून अंदाजे 90 किमी अंतरावर असलेलं लोणावळा पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतं. तिथल्या हिरव्यागार दऱ्या आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
लोणावळ्यातल्या भुशी धरण, टायगर पॉईंट आणि राजमाची किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पावसाच्या सरींमध्ये या ठिकाणांचे सौंदर्य जास्त खुललेलं दिसतं.
लोणावळ्याजवळ असलेला खंडाळा शांत आणि रम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तिथले घाटातले रस्ते धुक्याने झाकलेले दिसतात.
खंडाळ्यातल्या अमृतांजन पॉईंट आणि ड्यूक्स नोज या ठिकाणाहून सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल.
माथेरान हे आशियातले वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. त्यामुळे तिथल्या वातावरणात स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त राहता येतं.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पावसाळ्यात हिरवाईने नटून जाते. धुक्याने वेढलेले डोंगर आणि कोसळणारे धबधबे मन मोहून टाकतात.