Sakshi Sunil Jadhav
स्मार्टफोन सतत ऑन ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून किमान एकदा मोबाईल बंद करून पुन्हा सुरू केल्यास (रीबूट) फोनची बॅटरी लाइफ आणि परफॉर्मन्स दोन्ही सुधारते.
मोबाईल नियमितपणे बंद केल्याने बॅटरीला थोडा ब्रेक मिळतो. त्यामुळे बॅटरीचा ताण कमी होऊन तिचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
सतत चालू असलेले अॅप्स आणि बॅकग्राऊंड प्रोसेस RAM वर भार टाकतात. फोन बंद केल्यावर हे सर्व थांबतं आणि RAM नव्यासारखी रिफ्रेश होते.
दीर्घकाळ वापरामुळे फोन गरम होतो. फोन बंद केल्याने तो थंड होतो आणि ओव्हरहिटिंगची समस्या कमी होते.
कधी कधी सॉफ्टवेअर अपडेट्स पूर्णपणे लागू होत नाहीत. फोन रीबूट केल्याने अपडेट्स आणि अॅप्स व्यवस्थित इन्स्टॉल होतात.
फोन बंद केल्याने कॅश मेमरी क्लिअर होते. यामुळे फोन हँग न होता जास्त वेगाने आणि स्मूथ काम करतो.
दीर्घकाळ ऑन राहिल्यामुळे नेटवर्क सिग्नल कमजोर होऊ शकतो. फोन बंद करून पुन्हा सुरू केल्यास सिग्नल पुन्हा मजबूत होतो.
काही अॅप्स नकळत डेटा आणि बॅटरी वापरत राहतात. फोन बंद केल्याने ही अनावश्यक प्रोसेस थांबते.
थोड्या वेळासाठी फोन बंद ठेवल्याने डिजिटल दुनियेपासून ब्रेक मिळतो. यामुळे ताण कमी होतो आणि वास्तव जीवनावर लक्ष केंद्रित करता येते.